Ad will apear here
Next
‘जनसहभागातून ‘भाजप’चा जाहीरनामा तयार होणार’
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन


मुंबई : ‘भारताचे भविष्य कसे घडावे, हे जनतेच्या सूचनेतून निश्चित होण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) ‘भारत के मन की बात, मोदीजी के साथ’ ही देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. देशभरातील जनतेकडून मिळणाऱ्या सूचनांच्या आधारे ‘भाजप’चा लोकसभा निवडणूक जाहीरनामा तयार होणार आहे. जनभागीदारीतून जाहीरनामा तयार करण्याची ही जगातील सर्वात मोठी मोहीम आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईत केले.

‘भाजप’ने नऊ फेब्रुवारी २०१९ रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी, मुंबई ‘भाजप’ अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार राज पुरोहित व प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

गोयल म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘भाजप’च्या केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत लोकसहभागातून विकासकार्याला जनआंदोलन बनवले आहे. त्याच प्रकारे आगामी काळात देशाने कशी वाटचाल करावी व भारताचे भविष्य कसे घडवावे, हे जनतेच्या सूचनांच्या आधारे निश्चित व्हावे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यानुसार ‘भाजप’ने ही जगातील सर्वांत मोठी संपर्क मोहीम सुरू केली आहे. देशातील तालुकास्तरापर्यंत साडेसात हजार सूचना पेट्या ‘भाजप’ कार्यकर्ते नेत असून, त्याद्वारे लोकांना आपल्या सूचना देता येतील. देशभरात ४०० रथ पाठविले असून, त्याद्वारे जनतेला ‘भाजप’ सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती देण्यात येत आहे. जनतेला ट्विटर, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सूचना पाठवता येऊ शकतात.’



जनतेकडून आलेल्या सर्व सूचनांचा अभ्यास राज्य व राष्ट्रीय स्तरावरील गट करणार असून, त्यानंतर तज्ज्ञांशी बातचित करून या सूचनांच्या आधारे ‘भाजप’चे निवडणूक संकल्पपत्र तयार करण्यात येणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.

मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, ‘‘भारत की मन की बात, मोदीजी के साथ’ या मोहिमेअंतर्गत ‘भाजप’चे नेते देशात ठिकठिकाणी भेटी देऊन जनतेच्या सूचना जाणून घेत आहेत. देशभरातील दहा कोटींपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहचून विविध मार्गांनी त्यांचे मन जाणून घेण्याचा ‘भाजप’चा प्रयत्न आहे. अशा प्रकारचा हा जगातील सर्वांत मोठा उपक्रम आहे.’

दरम्यान, गोयल यांनी शनिवारी मुंबईत स्टार्टअपसंबंधी प्रतिनिधींशी संवाद साधला; तसेच समाजातील मान्यवरांशी संवाद करण्याच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांची भेट घेतली. या वेळी मुंबई भाजपाध्यक्ष आमदार शेलार व आमदार पुरोहित उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZSPBX
Similar Posts
‘नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ‘भाजप’चा विजय संकल्प’ मुंबई : ‘गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत देशाला पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार हवे आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) स्पष्ट बहुमताने पुन्हा केंद्रात सरकार स्थापन करण्याचा विजय संकल्प करून ‘भाजप’चे कार्यकर्ते कामाला लागले आहेत,’ असे प्रतिपादन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईत केले
‘मोदी सरकारच्या कामांमुळे देशाचा आर्थिक पाया मजबूत’ मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यात आला असून, त्याच्या आधारे भारत देश हा विकसित देश होण्याची आणि महाशक्ती बनण्याची आकांक्षा आपण ठेऊ शकतो,’ असे प्रतिपादन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले.
‘मोदी सरकारकडून जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण’ मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारने कमीत कमी वेळात जनतेच्या जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण केल्या आहेत,’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (ता. २९) मुंबईत केले.
‘महाराष्ट्राला न्याय देणाऱ्या मोदी सरकारचे आभार’ मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांत प्रचंड मोठे विकास कार्य केले असून, हे सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून न्याय मिळाला असून, राज्याच्या वतीने आपण मोदी सरकारचे आभार मानतो,’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language